spot_img
मनोरंजनअनंत अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना काय मिळालं? 'या' अभिनेत्रीने सांगितलं सत्य...

अनंत अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना काय मिळालं? ‘या’ अभिनेत्रीने सांगितलं सत्य…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, मात्र याबाबत एक महत्त्वाची चर्चा रंगली होती.

अफवा पसरली होती की या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे देण्यात आले होते. याबाबत अभिनेत्री अनन्या पांडेने स्पष्टता दिली आहे. तिच्या मते, “हे सर्व अफवा आहेत. कोणालाही पैसे दिले गेले नाहीत. प्रत्येकजण त्यांच्या इच्छेने उपस्थित होता.”

अनन्या पांडेने अनंतच्या लग्नाच्या वरातीत तिच्या डान्सबद्दलही भाष्य केले. तिने सांगितले की, “तो माझा मित्र आहे, आणि मी त्याच्या लग्नात मनापासून नाचले.” अनंत आणि राधिका यांचे प्रेम गोड असल्याचे तिने नमूद केले आणि त्यांच्या नात्याची प्रशंसा केली.

तिने अंबानी कुटुंबाच्या स्वागताचीही प्रशंसा केली, “फंक्शन्स कितीही मोठे असले तरी त्यांनी सर्वांचे प्रेमाने स्वागत केले. हे सर्व काही वैयक्तिक वाटते.” असे ती म्हणाली.

सध्या अनन्या तिच्या पहिल्या वेब सीरिज “कॉल मी बे”साठी चर्चेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...